फ़ेसबुकच्या भिंतीवरती आजकाल,
टोळीयुद्धाचा भडका उडालाय....
टोळ्याटोळ्यांनी आदिमानवांनी,
काव्य रचनांचा फ़डशा केलाय....
जंगल झालंय कवितांचे सारे,
निबंध गोष्टीतर विचारु नका.....
कोण गप्पा मारतंय कुणीकडे,
तर कोण मारतंय कुणास हाका....
प्रत्येकाची वेगळीच टोळी,
पोष्ट नसतात फ़ाटकीच झोळी....
मारुन मुटकुन सैनिक आणतात,
जशी गळाला लटकती मासोळी....
टोळी आली की मोरक्या आलाच,
भाऊचा रोजचा तोराही नवाच....
त्याने काहीही भंकस लिहायचं,
पण कमेंटचा गठ्ठा त्याला हवाच...
No comments:
Post a Comment